अहमदनगर
वाहीरा येथील संत शिरोमणी शेख महंमद महाराज,यांच्या दरबारात दरोरोज चालु असलेल्या महारतीचा कार्यक्रम सुरू केला आहे.या महा आरतीला माणीक गडाचे महंत मठाधिपती दत्तगीरी महाराज,आज उपस्थित होते. ठंयावेळी महाराजांनी,
. संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांचं थोडक्यात जीवन कार्य सांगितलं . व ते पुढे म्हणाले.
गावकऱ्यांनी जो महाआरती चा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे. तो खरोखरच कौतुकस्पद व नावीन्य पूर्ण आहे. बाबांच्या समाधी दर्शनाने व तेथील वातावरणामुळे माणूस शांत,समाधानी होतो. त्या निम्मित सर्व गावकरी एकत्र येतात. एकमेकांच्या विचारांची देवाण घेवाण होते. परस्परांमध्ये सौख्याच व जिव्हाळ्याचे वातावरण तयार होते , एक दिवस वाहिरा गाव जगाच्या नकाशात चमकल्या शिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .
व,संत शिरोमणी शेख महंमद महाराज याचं जीवन चरित्र लेखनाचं काम कवी, साहित्यिक किसन आटोळे सर , सिद्धीनाथ मेटे महाराज प्रभोधन समिती (अध्यक्ष) महाराष्ट्र राज्य हे करत आहेत. त्यांचे हि कौतुक केले व महाआरती प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांचे व तरुणांचे देखील खूप खूप कौतुक केले. व म्हणाले जगात खूप मोठे साहित्य आहे. त्या मध्ये कथा , कादंबरी असतील.मात्र काही कादंबऱ्या मध्ये एकाच व्यकी वरती ज्यास्त भर दिला जातो. मात्र संत साहित्या मध्ये तस होत नाही . सत्य परस्थितीच त्या मध्ये वर्णन केल जात.त्या मुळे त्यात वेगळीच गोडी निर्माण होते. व पुन्हा पुन्हा वाचन करावस
वाटते,आणि ते कोणते साहित्य असेल , तर ते संत साहित्यच असेल . असे प्रतिपादन महंत मठाधिपती ह.भ.प.दत्तगिरी महाराज यांनी केले
व कार्यक्रमाचे सूत्र संचालन किसन आटोळे,यांनी केले . आणि आभार सतिश आटोळे उपसरपंच , वाहिरा यांनी मानले.