महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण करावं--नारायण राणे
न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असा सल्ला नारायण राणे यांनी दिला
काल सुशांत सिंह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतीयांच्या मनातील निर्णय आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते नारायण राणे यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे. यावेळी नारायण राणे यांनी सरकारमधील एका व्यक्तीसाठी आपला वापर करु नये असा सल्ला मुंबई पोलिसांना दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.“ही वेळ का आली याचं महाराष्ट्र सरकारने आत्मपरीक्षण करावं. हे सरकार जनतेसाठी नाही, तर सत्तेचा दुरुपयोग आपल्यासाठी कसा करावा यासाठी आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य आहे,” असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपलं तोंड बंद करावं असं मला वाटतं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प