*जप्त मद्य साठा परस्पर विक्री प्रकरण: अधिकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई कशामुळे? जनतेच्या मनात संभ्रम !*
नंदुरबार : शहरातील एका हॉटेलवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेला मद्य साठा दुसऱ्या बारचालकाला विक्री केल्याचे प्रकरण आता अधिकच चर्चेेत आले आहे.
सुदर्शन न्युज, केतन रघुवंशी ,
नंदुरबार : शहरातील एका हॉटेलवर कारवाई केल्यानंतर जप्त केलेला मद्य साठा दुसऱ्या बारचालकाला विक्री केल्याचे प्रकरण आता अधिकच चर्चेेत आले आहे. कारण या घटनेनंतर संबंधीत अधिकाऱ्याची तातडीने बदली करीत चौकशी सुरू करण्यात आली खरी. परंतु घटना घडून ईतके दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल करण्यात कमालीची दिरंगाई केली जात आहे. मग चौकशीचा केवळ फार्स आहे की अधिकाऱ्याला वाचवण्याची तजवीज केली जात आहे ? अशा शंका लोकांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत.
हे प्रकरण सर्वप्रथम सुदर्शन न्युज ने उजेडात आणले होते त्यानंतर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ताबडतोब दखल घेतली व कारवाईचे चक्र गतीने फिरले. सुत्रांच्या माहितीनुसार या घटनेची पार्श्वभूमी अशी की उपनगर पोलिसांनी एका दारु दुकानावर धाड टाकली. दारुचा साठा जप्त करीत संबंधिताविरुद्ध गुन्हाही दाखल केला. तशातच हा मद्यसाठा विक्रीचा घाट पोलिसांनी रचला. त्यासाठी एका बारचालकाला हा मुद्देमाल दाखविण्यात आला. पोलिसांच्या ताब्यातील हा मुद्देमाल त्याने खरेदीही केला आणि विक्रीसाठी दुकानात आणला. तशातच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संबंधित दारु विक्रेत्याकडे धाड टाकली. तेव्हा दारुच्या खोक्यांवर उपनगर पोलिसांचा गुन्हा क्रमांकासह कायदेशीर कारवाईचे शेरे आढळून आले. कारवाई करणाऱ्या पथकास आढळले की हा एका हॉटेलवरील छाप्यात जप्त केलेला मद्यसाठा आहे. मग हा प्रकार छापा टाकणाऱ्या पथकाने वरिष्ठांना कळविला. तेव्हा उपनगर पोलिसांचे बिंग फुटले. त्याच्या वृत्त सुदर्शन न्युज मधून प्रकाशित झाले दरम्यान पथकाने ही माहिती देताच कर्तव्य दक्ष पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दखल घेतली. या प्रकरणामुळेच उपनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील नंदावळकर व पो.हे.कॉ.मनोज सरदार यांना तातडीने मुख्यालयात जमा करण्यात आले असे म्हटले जाते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असेही समजते की, स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तीन दिवसात त्यांना अहवाल देण्याचे सांगण्यात आले होते. परंतु तीन दिवसांची मुदत उलटून आणखी आठवडा उलटला आहे. तरीही चौकशी पूर्ण होऊन जप्त मद्यसाठा परस्पर विकण्याचा गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार की नाही? हा प्रश्न जनतेच्या मनात कायम आहे. त्याची चौकशी डी.वाय.एस.पी.सचीन हिरे यांच्याकडे सोपविण्यात आली असून तपासात अडसर नको म्हणून दोघांना तातडीने नियंत्रण कक्षात जमा केले. पण चौकशीत काय निष्पन्न झाले याचा उलगडा अजून झालेला नाही. घटनेला एवढे दिवस उलटूनही अद्याप पावेतो गुन्हा का दाखल झाला नाही ? पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जागी सर्वसामान्य व्यक्ती असती तर एवढी मुभा मिळाली असती का? असे प्रश्न लोकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस दलातूनससूध्दा असाच सूर उमटत आहे. सर्व सामान्य सोडा अर्धा डझनहून अधिक पोलीस कर्मचारी असे आहेत की ज्यांच्यावर कोणतीही चौकशी न करता शुन्य मिनिटात गुन्हा दाखल करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. असे असताना पोलीस निरीक्षक नंदवळकर यांना बचावाचे विशिष्ट अधिकार अन संधी का दिली जाते आणि कोणामुळे दिले जात आहेत असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवत आहेत ?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुद्देमाल क्लर्क व 1/2 हवलदार यांना बळीचा बकरा बनवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे वाचवता येईल, याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र कर्तव्य दक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित व उपअधीक्षक सचिन हिरे यांच्यावर जनतेचा पूर्ण विश्वास असून दोषींवर चौकशी अंती योग्य ती कार्यवाही होईल, हा जनतेला व सुदर्शन न्युज ला पूर्ण विश्वास आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प