नंदुरबार : कोरोनाने सारे काही उध्वस्त केले आहे. मात्र आज ना उद्या कोरोना जाईल व नवरात्रोत्सवाचा आणि यात्रांचा हंगाम सापडेल, त्यात फुलांची विक्री होऊन दोन पैसे हाताशी येतील, अशी अपेक्षा करीत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी फुलांची रोपे लावून पोटचा मुलाप्रमाणे वाढविली.त्यात अतिवृष्टीने काही सडली तर जे वाचली ती बहरली मात्र नवरात्रोत्सव नाही, देऊळे बंद, यात्रोत्सव बंद, धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येऊन फुलांना चांगला भाव मिळेल ,अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.त्यामुळे उत्पादन खर्च निघणेही मुश्कील असल्याचे चित्र आहे.
देऊळे बंद, यात्रोत्सव बंद, धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येऊन फुलांना चांगला भाव मिळेल ,अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे