सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी )नंदुरबार
आज दिनांक 28 सप्टेंबर 2020 रोजी नंदुरबार जिल्ह्यात वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
यात ज्वारी, बाजरी, मका, पपई, कापूस, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. आधीच कोरोना महामारी
मुळे अडचणीत असलेल्या शेतकरी अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकरी बांधवांना शासनाने तात्काळ मदत द्यावी या मागणीचे निवेदन
देताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बुधा भाई पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भाऊसाहेब राजपूत व अरुण पाटील आदी मान्यव
यावेळी जिल्हाधिकारी श्री राजेंद्र भारूड साहेब यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश दिले.