सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार येथील प्राप्तिकर विभागाचे कार्यालय नंदुरबार हुन धुळे येथे वर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी व करदात्या नागरिकांची गैरसोय होत असल्याची बाब मा.खा.डॉ. हिनाताई विजयकुमारजी गावित यांच्या निदर्शनास आल्यानंतर दि. २२/०९/२०२० रोजी या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.श्री अनुरागजी ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.
जिल्ह्यातील नागरिकांना आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कामानिमित्त धुळे येथे जाणे गैरसोयीचे व वेळेचा अपव्यय करणारे असल्याने जिल्ह्यातील व्यापारी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे असलेले नंदुरबार प्राप्तीकर कार्यालय नंदुरबार येथे पूर्ववत सुरू ठेवावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही ही विनंती मा.खा.डॉ.हिनाताई विजयकुमारजी गावित यांनी केली.
त्या मागणीला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.श्री अनुराग जी ठाकूर यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही असे आश्वासन दिले.