सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदूरबार धडगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही प्राथमिक सोयीसुविधा मिळालेल्या नाही.ग्रुप ग्रामपंचायत वेलखेडी येथील
पलासझाडी आणि शेंद्रापाडा या गावांमध्ये पाणी,रस्ते,आरोग्य, सुविधांची वानवा आहे.येथील ग्रामस्थांनी पलासझाडी ते कुवरखेत
पर्यंत 12 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तहसील कार्यालय,स्थानिक आमदार-खासदार यांच्याकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम झालेले नाही
. लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण का केले नाही असा सवाल गावातील तरुण आणि ज्येष्ठ मंडळींनी उपस्थित केला आहे.
पलासझाडी ते कुवरखेत 10 ते 12 किलोमीटर दर्या-खोर्यातून पाय वाट काढत आजारी रुग्णांना बांबुलन्स द्वारे न्याव लागतं.कुवरखेत येथे गाडी मिळाली नाही
तर पुन्हा गुंडांनचापाडा पर्यंत 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो.त्यानंतर खाजगी वाहनाने 40 किलोमीटर लांब धडगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी
जावे लागते. शासनाने आता तरी आमच्याकडे लक्ष देऊन प्राथमिक सोयी सुविधा पुरवाव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे