तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
नंदुरबार, दि.17(जिमाका वृत्तसेवा) : आज पुर्णा नदीची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झालेली असून हतनूर धरणातून पुढील 4 ते 8 तासांमध्ये तापी नदीपात्रात पाणी प्रवाह सोडण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील प्रकाशा व सारंगखेडा बँरेज मध्यम प्रकल्पातून पुढील 48-72 तासात पाण्याचा येवा लक्षात घेता प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दोन्ही प्रकल्पातून विसर्ग वाढविण्यात येईल.
तरी तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, याबाबत आवश्यक खबरदारी म्हणून गावांत दवंडीद्वारे नागरिकांना सूचना द्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.
0000
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प