सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तापी काठावरील गावांना पुन्हा धोक्याचा ईषारा

नंदुरबार - तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने

Nandurbar MH
  • Aug 30 2020 2:33PM
     सुदर्शन न्युज नंदुरबार - तापी नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असून पातळीत वाढ झाल्याने तापीपात्राला रौद्ररुप आले आहे. पुढील 72 तासापर्यंत तापी नदीकाठच्या गावांना यामुळे  सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे दुपारी 4  वाजता उघडले असून 1 लाख 21 हजार 430 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे. वाघूर धरणाची पाणी पातळी लक्षात घेता या धरणाचे वक्रद्वार उघडण्यात येऊ शकतात. तापी नदीपात्रात पाण्याची सतत आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे.
पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी 4 वाजता प्रकाशा बॅरेजचे 7  दरवाजे 3 मीटरने उघडण्यात आले असून 61  हजार 537  क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर सारंगखेडा बॅरेजचे 7 दरवाजे 3 मीटरने उघडण्यात आले असून 69  हजार 128 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी  विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. ऋषीपंचमी निमित्त महिलांनी तापी नदीकाठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. नदी काठावर असलेले उपसा पंप तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
----

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार