नंदुरबार दि.23: महाराष्ट्र आणि गोवा राज्यांशी संबंधित टपाल सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची दखल 29 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या 116 व्या डाक अदालतीत घेण्यात येणार आहे.
या डाक अदालतीत टपाल वस्तू, मनीऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र अशा सेवेंबाबतच्या तक्रारींचा समावेश असेल. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार एम.शान्तला भट्ट, सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज.शि ) तथा सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, जीपीओ इमारत, दुसरा माळा, मुंबई यांचेकडे 10 सप्टेंबर 2021 पर्यंत दोन प्रती सह अथवा तत्पुवी पोहोचे अशा बेताने पाठवावी. असे मुख्य पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल मुंबई यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333