नंदुरबार - तापी काठावरील प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा तीर्थ क्षेत्रावरील माजलेले घाणीचे साम्राज्य आणि देवी-देवतांच्या खंडित प्रतिमांची व मूर्तींची चाललेली विटंबना याविषयी विशेष वृत्त सुदर्शन न्युज ने झळकवल्यानंतर केदारेश्वर मंदिर व्यवस्थापनाने ताबडतोब दखल घेऊन तापी काठावरील घाटांची आणि मंदिर परिसराची स्वच्छता राबवण्याचे काम हाती घेतले. सुदर्शन न्युज च्या तत्परतेमुळे केदारेश्वर मंदिर परिसर घाणीच्या साम्राज्यातून मुक्त होत असल्याची प्रतिक्रिया देत अनेक भाविकांनी धन्यवाद दिले आहेत.
याविषयीचे अधिक वृत्त असे की, असंख्य हिंदू भाविक आपल्या घरातील खंडित मूर्ती आणि देवी-देवतांच्या खंडित प्रतिमा तापी नदीत वाहू घालत असतात. अनेक श्रद्धाळू घरातील आणि मंदिरातील टाकाऊ झालेल्या पूजेच्या वस्तू साहित्य आणि निर्माल्य येथे आणून टाकून जातात परिणामी प्रति काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पवित्र तीर्थक्षेत्रावर जागोजागी खंडित देवी-देवतांच्या प्रतिमा आणि मूर्तींची रोज रोज विटंबना होत असते. इतस्ततः पोते भरून निर्माल्य पडलेले दिसते सडके कागद सडक्या फुलमाळा यांचे ढीग दिसतात. परंतु केदारेश्वर सारख्या पवित्र देवस्थानाची तसेच तापी काठावरील पवित्र पूजा पाठ करण्यासाठी बांधलेल्या घाटांची अशा पद्धतीने चाललेली विटंबना हिंदू भाविक लक्षात का घेत नाही असा प्रश्न करून अनेकजण संताप व्यक्त करताना दिसले. संबंधित मंदिर व्यवस्थापनाने याविषयीचे प्रबोधन कार्य तसेच नियमित स्वच्छतेचे कार्य राबवावे ही अपेक्षा सुदर्शन न्यूज कडे अनेकांनी बोलून दाखविली. त्याच्या सविस्तर वृत्त सुदर्शन न्यूज ने प्रदर्शित केले घाट परिसर मंदिर परिसर आणि तीर्थक्षेत्राचा अन्य परिसर कसा घाणीने वेढलेला आहे हे सुदर्शन न्युज च्या माध्यमातून केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील, केदारेश्वर ट्रस्ट सदस्य सुरेश पुना पाटील यांना कळाले. त्यानंतर लगेचच त्यांनी कार्यकर्त्यांची आणि सेवकांची नेमणूक करून स्वच्छता कार्य राबवले त्यामुळे प्रति काशी प्रकाशा तीर्थक्षेत्र घाणीच्या साम्राज्यातून मुक्त होताना दिसू लागले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333