सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार
नंदुरबार : गेल्या दोन वर्षात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत पिकाच्या नुकसानीबाबत शासनातर्फे कोरोनाच्या संकटकाळात मदतीचा हात दिल्याने बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत 25 कोटी रुपयापेक्षा अधिक मदतीचे वाटप करण्यात आले.
जुलै ते ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 12 हजार 150 शेतकऱ्यांना 16 कोटी 52 लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 4 कोटी 658 लाख (2754 शेतकरी), नवापूर 53 लाख 68 हजार (1135), शहादा 6 कोटी 99 लाख (3361), तळोदा 2 कोटी 83 लाख (2699), अक्कलकुवा 96 लाख 34 हजार (1100) आणि अक्राणी तालुक्यात 54 लाख 28 हजार (1101 शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.
जुन ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत 16 हजार 124 शेतकऱ्यांना 8 कोटी 60 लाखाची मदत देण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 32 लाख 5 हजार (472 शेतकरी), नवापूर 1 कोटी 56 लाख (4836), शहादा 90 लाख 48 हजार (1299), तळोदा 44 लाख 78 हजार (904), अक्कलकुवा 1 कोटी 28 लाख (2364) आणि अक्राणी तालुक्यात 4 कोटी 7 लाख (6249 शेतकरी) मदतीचे वाटप करण्यात आले.
मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. प्रशासनाने प्राप्त झालेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी तालुका स्तरावर नियेाजन केले होते. 2019 च्या मदतीपैकी 99.74 टक्के व 2020 च्या मदतीपैकी 90 टक्के रकमेचे वाटप करण्यात आले आहे. 2020 च्या उर्वरीत रक्कमेचे वाटपाची कार्यवाही तालुकास्तरावर सुरु आहे.