सलग नऊ वेळा निवडून आलेले खासदार माणिकराव गावित यांचे अनंतात विलीन
माणिकराव गावित यांचे अनंतात विलीन
नंदुरबार - नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून सलग ९ वेळा निवडून आलेले माजी खासदार माणिकराव गावित यांचे १७ सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी ८ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि.१८ रोजी रविवारी सकाळी ११ वाजता नवापूर येथील राहत्या घरुन निघणार आहे.
माजी खासदार माणिकराव गावित हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.त्यांना उपचारासाठी नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु असताना त्यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावीत यांनी आपला दौरा रद्द करुन माणिकराव गावित यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली होती.माणिकराव गावीत हे नंदुरबार जिल्ह्यातील लोकांचे आवडते खासदार होते.सादा सरळ स्वभावाचे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सर्व सामान्य माणसाला ते आपले वाटायचे. केंद्रीय गृह राज्यमंत्री असताना त्यांनी कधीही आपला स्वभाव टाकला नाही.सिदा साधा,अपना माणिकराव दादा, असे लोकं बोलायचे. याच मंत्रीपद काळात त्यांच्या वर राजकीय आरोप झाले असताना लोकसभेतील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते सुषमा स्वराज, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह लोकसभेतील सर्व खासदारांनी संसदेत उभे राहून माणिकराव दादांच्या प्रामाणिकपणाची खात्री दिली. प्रामाणिक नेता म्हणून भारतातील सर्व खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. खासदार माणिकराव गावित यांच्या मृत्युमुळे नंदुरबार जिल्ह्यातील मोठी राजकीय हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सुन,जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी जि.प अध्यक्ष भरत गावीत व इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे वडील तर जि.प.सदस्या संगिता भरत गावीत यांचे सासरे होते.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प