शेतीच्या वादातून कुटुंबाला मारहाण तलावीपाड्याच्या ५ जणांवर गुन्हा दाखल
शेतीच्या वादातून कुटुंबातील पाच जणांना हाताबुक्क्याने व लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण झाल्याची
विसरवाडी - शेतीच्या वादातून कुटुंबातील पाच जणांना हाताबुक्क्याने व लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण झाल्याची घटना घोगळपाडा शिवारातील शेतात घडली आहे.याप्रकरणी तलावीपाड्याच्या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सकुबाई गोशा वळवी शेतीच्या वादातून (७३,रा.मोग्राणी) या दि.२ ऑगस्ट रोजी ९.३० वाजता आपल्या घोगळपाडा शिवारातील शेतात असताना दासु विरजी वळवी,वासु दासु वळवी (या.तलावीपाडा) यांनी शेतात येऊन शेतीच्या वादातून सकुबाई गोशा वळवी यांना हाताबुक्क्याने मारहाण केली.सदर भांडण सोडविण्यासाठी त्यांचे पती गोशा वळवी व मुले राजु वळवी,मोहन वळवी,भरत वळवी हे आले असता त्यांना लाकडी डेंगाऱ्याने बेदम मारहाण करून वाईट शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोना प्रशांत पाटील करीत आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प