विखरण येथे एका रात्रीत २ घरफोड्या
शेती हंगामासाठी साठवलेले पैसे चोरी झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
नंदुरबार- तालुक्यातील विखरण येथे अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत २ ठिकाणी घरफोड्या करुन रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.शेतीच्या हंगामासाठी साठवलेले पैसे चोरी झाल्याने शेतकऱ्याला रडून एकच आक्रोश केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, विखरण येथील शेतकरी आत्माराम धाकू पाटील हे कुटुंबासह गुरुवारी रात्री घराच्या छतावर झोपण्यासाठी गेल्याची संधी साधुन अज्ञात चोरांनी पहाटेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडुन आत प्रवेश केला.चोरट्यांनी लोखंडी पेटीत ठेवलेले १ लाख ३० हजार रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने चोरुन नेले.
यानंतर चोरट्यांनी गावातील चंद्रभान विनायक पाटील यांच्या घराचा कडीकोंडा तोडुन कपाटातून ५ हजार रुपये रोख व चांदीचे दागिने लंपास केले.
सकाळी घरातील लोकं जागी झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला.एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्याने विखरण गावात खळबळ उडाली आहे.सदर माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला.पोलिसांच्या श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढला.परंतु यश मिळाले नाही.
शेतकऱ्याला रडू कोसळले
पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या समोर शेतकरी आत्माराम पाटील यांचे अश्रू अनावर झाले होते. पोटाला चिमटा देऊन शेतीसाठी पैशांची साठवणूक केली होती.तेच पैसे चोरी झाल्याने आता शेती कशी करायची हा प्रश्न त्यांना पडला होता.काहीही करा... साहेब माझे पैसे परत आणुन द्या... अशी याचना पोलिस निरीक्षक यांच्या समोर शेतकऱ्याने केली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प