सोशल मीडियावरील क्षुल्लक प्रकार सामंजस्याने न मिटवता 20 वर्षाच्या तरुणाचे भविष्य उध्वस्त करणारे काही अधिकारी शहरातील अवैध धंदे मात्र धृतराष्ट्र बनून पाहतात
शहरातील अवैध धंदे मात्र धृतराष्ट्र बनून पाहतात
नंदुरबार- सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचा कारणावरून शहरातील एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.या गुन्ह्यामुळे कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.पोलिस दलाकडे वाद सामोपचाराने मिटविण्याची यंत्रणा असताना या हिंदू तरुणांवर गुन्हा दाखल करण्या अगोदर त्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्याचा विचार पोलिसांनी करायला पाहिजे होता, असे बोलले जात आहे.कायद्याच्या दृष्टीने पोलिसांनी सदर तरुणांवर दाखल केलेला गुन्हा कदाचित बरोबर ही असेल परंतु पोलिस ठाण्यात आरोपी कसे कमी जास्त केले जातात याचा अनुभव लोक चर्चा करतात. भाजपा प्रवक्ता यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम सुतार मोहल्ला येथे नुकताच झाला.सदर कार्यक्रम पोलिसांची परवानगी न घेता केला होता.याप्रकरणी आरोपींविरुद्ध मनाई आदेशाचे उल्लंघनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परंतु आंदोलन कर्ते भरचौकात एका हिंदू महिलेचे सर धड हे जुदा,हिच सजा अशा घोषणा देत होते.म्हणजे सदर महिलेचे शीर कापुन ते शरीरापासून वेगळे करण्याची सजा देणार, ही भाषा कायद्याच्या कोणत्या कलमात बसते.त्याला पोलिसांनी कुठलेही कलम लावले हे जनतेला सांगा.ईद मिलनाचा मुशायरा रात्री उशिरापर्यंत चालतो गुन्हा दाखल होतो.फक्त एकावर.इतर आयोजक रजेवर गेले होते काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नंदुरबार शहरात व जिल्ह्यात अवैध धंद्यांना ऊत आला.ठिकठिकाणी सट्टा जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहे.हॉटेलातुन वेश्याव्यवसाय सुरु आहे.अल्पवयीन मुली व शाळकरी तरुणींचे आयुष्य बर्बाद केले जात आहे.वाळु तस्करी खुलेआम होत आहे.गुटखा तस्करी साठी नंदुरबार जिल्हा कुप्रसिद्ध झाला आहे.हे सर्व गैरप्रकार व अवैध धंदे काही भ्रष्ट पोलिस अधिकारी व भ्रष्ट पोलिस कर्मचारी यांच्या मुळे होत आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था याठिकाणी राबवली पाहिजे.जुगारात पैसे हारणारा तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसत आहे.कडक कायदे राबवायचे असतील तर पोलिसांनी येथे राबवावे.संपूर्ण आयुष्यात एकही नियम न मोडणाऱ्या वर पोलिसांचा दंडुका चालवुन काय उपयोग? असा सवाल लोक विचारतात.नंदुरबार शहरात व जिल्ह्यात अनेक ठिकाणी तरुणांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.हे अज्ञात तरुण कोणावरही प्राणघातक हल्ला करतात.जीटीपी कॉलेज रस्त्यावर मागे एका तरुण वकील व त्यांच्या मित्राला मारहाण झाली.त्यानंतर पुन्हा एका व्यापाऱ्याला मारहाण झाली.पोलिसांनी आपला हिसका याठिकाणी दाखवण्याची गरज आहे.पोलिस हद्दीत जनता सुरक्षित राहते नसेल तर पोलिस अधीक्षक यांनी चांगल्या उद्देशाने भरविलेला जनता दरबार ढोंग ठरेल. ज्याप्रमाणे आपले वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी जनता दरबार,लोक अदालत आहे.महिलांसाठी महिला दक्षता समिती आहे.अल्पवयीन मुलांसाठी सुधारगृहे आहेत.त्याप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांसाठी पोलिसांनी काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प