समशेरपूर कारखान्याच्या ऊसाच्या मळीला लागली भिषण आग 11 कोटींचे झाले नुकसान
नंदुरबार- तालुक्यातील समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याच्या ऊसाच्या मळीच्या टाकीला काल शनिवारी सकाळी अचानक आग लागली
नंदुरबार- तालुक्यातील समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याच्या ऊसाच्या मळीच्या टाकीला काल शनिवारी सकाळी अचानक आग लागली.या भिषण आगीत सुमारे अकरा कोटी रुपयांची ऊसाची मळी जळून खाक झाली आहे.
समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याच्या ऊसाच्या मळीच्या टाकीमधून शनिवारी सकाळी अचानक धुर निघत असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसले. त्यानंतर आगीने रौद्ररूप धारण केले.यावेळी अग्निशमन दलाच्या बंबाने ऊसाच्या मळीच्या टाकीवर पाण्याचा फवारा मारण्यात आला.काही तासांनंतर आग आटोक्यात आली.सदर आगीत सुमारे अकरा कोटी रुपयांची नऊ हजार मेट्रिक टन ऊसाची मळी जळून खाक झाली आहे. ऊसाची मळी ही ज्वलनशील पदार्थ असल्याने अति तापमानामुळे आग लागली,असा अंदाज व्यक्त होत आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प