नंदुरबार - शहरातील चहू दिशांच्या चौफुल्यांवर, प्रमुख चौकांमधे तसेच प्रमुख रस्त्यालगत अचानक पणे अनोळखी चेहऱ्यांच्या विक्रेत्यांमध्ये वाढ झाली आहे. विशिष्ट धर्माच्या अनोळखी लोकांची विक्रेत्यांच्या स्वरूपात वाढणारी ही संख्या धोक्याची घंटा मानली जात असून पोलीस विभाग अशा संशयास्पद लोकांची पडताळणी कधी सुरु करणार ? याकडे सुदर्शन न्युजने पोलिस दलाचे लक्ष वेधले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, शहरात ठीक ठिकाणी अनोळखी मुस्लिम विक्रेत्यांचे तंबू व स्टाँल थाटलेले अचानक दिसायला लागले आहेत. कोणत्याही जागृक नागरिकाला ही वाढलेली संख्या जाणवेल एवढ्या प्रमाणात ते दिसू लागले आहेत. हे अनोळखी विक्रेते सीबी पेट्रोल पंप, एस्सार पेट्रोल पंप, करण चौफुली, राजपूत पेट्रोल पंपजवळ, शहराची मध्यवर्ती बाजारपेठ या भागात प्रामुख्याने आढळत आहेत. अचानक वाढलेले अनोळखी चेहरे विशिष्ट धर्माचे आणि विशिष्ट पेहरावातीलच असल्याने ही धोक्याची घंटी तर नाही नं? अशी शंका जागरूक लोकांना वाटू लागली आहे. शहरात बस्तान मांडू पाहणाऱ्या या अनोळखी विक्रेत्यांनी शहर पोलीस स्टेशनला खबर दिली आहे का ? स्थानिक पोलिसांनी नियमा प्रमाणे यांची माहिती घेतली आहे काय ? हे प्रश्न यामुळे महत्त्वाचेे ठरतात. सायंकाळी अंधारात कुठल्या दुकानाच्या आडोशाला संशयास्पद आढळला म्हणून मागील काही महिन्यात अनेक गुन्हे दाखल झाले. तशी तत्परता पोलिस पथकांनी अचानक वाढलेल्या अनोळखी विक्रेत्यांबाबत देखील दाखवणे अपेक्षित बनले आहे.
या पूर्वी ही अश्या विक्रेत्यांच्या रुपात अनेक मोठे संशयित अपराधी, नक्षली, दहशतवादी जिल्ह्यातून पकडले गेल्याचा इतिहास आहे. हे लक्षात घेता माननीय जिल्हा अधीक्षक यांना जनतेच्या वतीने सुदर्शन न्युज ची नम्र विनंती आहे की, विशेष पथक बनवून जिल्ह्यातील सर्व प्रमुख पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वर्षातून किमान दोनदा अनोळखींचे व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया केली जावी. तसेच जिल्ह्यातील जनतेलाही सजग राहून आपल्या आसपास कुणी अनोळखी संशयित व्यक्ती अथवा फेरीवाले आढळल्यास सर्वप्रथम त्यास आधी ओळख पत्र आणि पोलीस रिपोर्ट विचारावा. ते नसल्यास त्वरित स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा. याविषयी प्रबोधन केले जायला हवे.
प्राप्त माहितीनुसार बाहेरून येणारे हे विक्रेते व दीर्घकालीन अनोळखी भाडेकरू मदरसे, मस्जिद व धर्मशाळांमध्ये वास्तव्य करतात. त्यांचे ऐडेंटिफिकेशन व राजीष्ट्रेशन लॉजिंगप्रमाणे होणे सक्तीचे करावे. अन्यथा संबंधित घरमालक, धर्मशाळा मालक , मस्जिद मदरसे, मौलवी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी, अशी माननीय पोलीस अधीक्षक यांनाा विनंती आहे. अपघातापेक्षा खबरदारी बरी, असे सुवचन आहे. ते लक्षात घेता काही तरी अनुचित घडल्या नंतर तपास करून गुन्हा निष्पन्न करण्यापेक्षा आधीच सावधानी राखून निगराणी कडक ठेवल्यास कार्यशक्ती अर्धी खर्च होईल व रिजल्ट दुप्पट लाभेल, ही जनतेच्या वतीने अपेक्षाषा आहे.
महिना भरा पूर्वीच दंगल घडली असल्याने जनता व व्यापारी अजूनही भीतीच्या सावटाखाली आहे. अशा परिस्थितीत अनोळखी व्यक्तीचा जिल्ह्यात मुक्त संचार शंका उत्पन्न करते. युद्धाच्या पाहिले तयारी व सराव मध्ये जेवढा घाम गळाला जाईल, तेवढे युद्धात रक्त कमी संडेल, ही छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण आहे. म्हणून आत्ताच जर कायदा सुव्यवस्था कडक ठेवली तर भविष्यात अघटित घडण्याची शक्यता कमी राहिल. यास्तव लवकरात लवकर तपासणी होणे आवश्यक असून जिल्हा पोलीस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333