मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी नेमकी कधीपर्यंत बंद राहणार?; राज्य सरकारचे उत्तर
मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.
मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ जूनपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून सर्वसामान्यांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसल्यानंतर राज्य सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकलचे दरवाजे अजून पुढील १५ दिवसांसाठी उघडले जाणार नाहीत अशी शक्यता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नाही. त्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु राहतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी करोना रुग्णसंख्या खालावत असलेल्या जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती दिली आहे. “राज्य सरकार १ जूननंतर रेड झोनच्या बाहेर असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही निर्बंध शिथील करण्यासंबंधी विचार करत आहे. सध्या ३६ पैकी १५ जिल्हे रेड झोनमध्ये असून तिथे निर्बंध अजून कठोर केले जाऊ शकतात,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प