सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

ठाकरे सरकार ठुस , वरून राणे करता धुस पूस

कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत 5 हजारावर, तर राज्यात 8 हजारांवर बळी गेले आहेत. असे असतानाही सरकार गंभीर नाही.

Aishwarya Dubey
  • Jul 8 2020 8:34PM
ठाकरे सरकार ठुस , वरून राणे करता धुस पूस

राज्यातील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गेल्या चार महिन्यांत महाराष्ट्र 10 वर्षे मागे गेला आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही, अशी स्थिती आहे. ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आहे ते, ‘मातोश्री’पुरतेच मर्यादित आहे, अशी टीका भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी आज सोमवारी पत्रपरिषदेत केली.
 

 भाजपा कार्यालयात राणे यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नीतेश राणे, राज पुरोहित उपस्थित होते. एकतर मुख्यमंत्री ‘मातोश्री’तून बाहेर येत नाहीत आणि आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार राज्याच्या हिताचे नाही. कोरोना, लॉकडाऊन, पोलिसांच्या बदल्या, पंढरपूरची महापूजा या मुद्यांवरून राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
 
 
कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत 5 हजारावर, तर राज्यात 8 हजारांवर बळी गेले आहेत. असे असतानाही सरकार गंभीर नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न हाताळले जात नाहीत. मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच बसत नाही. सगळा कारभार ‘मातोश्री’तून चालवला जातो. हे असेच राहणार असेल, तर ज्या सचिवालयाचे नाव बदलून मंत्रालय केले, त्याचे पुन्हा नाव बदलून सचिवालय करावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला.
 
 
मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करीत सुटले आहेत. मागचापुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन कुठपर्यंत करायला हवा, हेही ठरवायला हवे. लॉकडाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. मुंबईसारख्या शहरात रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकर्‍याला बोगस बियाणे देऊन फसवले जात आहे. कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना मदतीचा एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अजून पंचनामेही केले गेलेले नाहीत. पगाराचे प्रश्नही आ वासून उभे आहेत. होमगार्डचे पगार झालेले नाहीत. राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर हे सरकार जायला हवे, असे राणे म्हणाले.
 
अधिकारी राज्य चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही. बदल्या परस्पर केल्या जातात, त्या परत रद्द केल्या जातात. अशाप्रकारे राज्य चालू शकत नाही. राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर मी ठाम आहे व ते माझे वैयक्तिक मत आहे. मुंबई महापालिकेएवढा भ्रष्टाचार देशात दुसर्‍या कोणत्याच संस्थेत नाही. गेली 25-26 वर्षे मुंबईत कोणताही विकास झाला नाही. जागतिक कीर्तीचे हे शहर भकास झाले आहे. याला केवळ शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप राणे यांनी केला. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री कुठे सापडणार नाही आणि कोणी अशा मुख्यमंत्र्याला ठेवणारही नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.
पंढरपुरातील आषाढीची महापूजा महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाची असते. पण या पूजेला मुख्यमंत्र्यांनी महत्त्व दिले नाही. मुख्यमंत्री पंढरपुरात गेले तर कपाळावर साधे गंध लावले नाही आणि प्रसादही हातात घेतला नाही. हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. जर पिंजऱ्यात राहायचे होते तर मग ‘मातोश्री’तच विठ्ठलाची पूजा करायला हवी होती. पंढरपुरात कशाला गेलात, असा सवाल राणे यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तर त्यांच्यापुढे आहेत. उकडते म्हणून ते थेट कारमध्ये जाऊन एसीत बसले, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार