अहमदनगर
संगमनेर
साकुर पठार भागातील युटेक साखर कारखान्याचा चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ मोळी पूजनाने संपन्न झाला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष रविंद्रजी बिरोले, संचालक शंतनु बिरोले,ऍड.रामदास शेजुळ,हरीभाऊ गिते ,बाबाजी सागर तसेच परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याने भरघोष पगारवाढ केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यावेळी रवींद्र बिरोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मागील वर्षीची बाकी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देनार असुन कामगारांना देखील भरघोष पगारवाढ करन्यात आली असल्याचे यूटेक चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बिरोले बोलताना यावेळी म्हणाले.
तसेच शेतकर्यांनी उस तोडनीसाठी कारखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
कारखाना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी ऊभा असल्याचे ते यावेळी म्हनाले.