शेतकऱ्यांच्या विविध समस्या घेऊन आमदार मगेश चव्हाण तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या दालनात
विकास महामंडळ यांच्या दालनात
प्रतिनिधि दिपक चव्हाण
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे बॅरेज बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी वितरण, लघू पाटबंधारे तलाव हातगाव क्र.२, चितेगाव लघुपाटबंधारे, मुंदखेडे धरण येथील पाटचाऱ्या भूसंपादन व जमीन अधिग्रहण बाबत शेतकऱ्यांच्या विविध समस्या, गिरणा मन्याड नदीजोड कालवा सर्वेक्षण तसेच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दि.१० डिसेंबर पूर्वी गिरणा डावा कालवा व मन्याड उजवा कालवा यातून शेतीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात बैठक घेत सविस्तर चर्चा केली.
यावेळी कार्यकारी संचालक अरुण कामडे यांच्यासह मुख्य अभियंता आनंद मोरे तसेच लघुपाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते, बैठकीच्या सुरुवातीलाच वरखेडे लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्प या प्रकल्पाचा मुख्य कालवा व त्यावरील संपूर्ण वितरणाचे काम सिंचन अनुसरून बंदिस्त पाईपलाईन द्वारे करावयाचा प्रस्ताव मुख्यमंत्री व जलसंपदामंत्री यांना पाठवण्याबाबत सूचित केले.
पारंपरिक पाटचारी पाणी वितरणासाठी जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न येतो त्यात अनेक शेतकऱ्यांचा विरोध देखील होतो तसेच त्यासाठी २०० कोटींहून अधिक निधी लागणार आहे मात्र बंदिस्त पाईपलाईन प्रणालीद्वारे वरखेडे धरणाचा कालवा केल्यास भूसंपादनाचा प्रश्न मिटणार असून पाण्याची नासाडी देखील होणार नाही असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून व प्रस्ताव तयार करून तो राज्य शासनाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या.
तसेच लघू पाटबंधारे तलाव हातगाव क्र.२, चितेगाव लघुपाटबंधारे, मुंदखेडे धरण येथील पाटचाऱ्या भूसंपादन व जमीन अधिग्रहण बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी व मोबदला मिळण्यास होणारा उशीर याबाबत देखील कार्यकारी संचालक यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी हातगाव, अंधारी, तमगव्हाण, माळशेवगे, मुंदखेडे येथील शेतकरी उपस्थित होते.
तालुक्यातील ३० हुन अधिक गावांना जीवनदायी ठरणाऱ्या मन्याड धरणात नदीजोड योजनेतून गिरणा धरणातील पाणी टाकणे, गिरणा डावा व मन्याड उजवा कालव्याची दुरुस्ती प्रस्ताव, मण्याड धरण उंचीवाढ व पाणी उपलब्धता प्रमाणपत्र याबाबत मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री यांना पत्र दिले होते. त्यानुसार कार्यवाही करणेबाबत मंत्रालयातुन सूचना तापी पाटबंधारे महामंडळाला मिळाल्या असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याची माहिती कार्यकारी संचालक यांनी दिली.
यावर्षी गिरणा व मन्याड ही दोन्ही धरणे १०० टक्के भरल्याने दि.२० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत दोन्ही धरणातून रब्बी हंगामासाठी आवर्तन देण्यात यावे व किमान ३ आवर्तनांच्या माध्यमातून शेतीला पाणी देण्याचे नियोजन करण्याची सूचना केली असता संबंधित अधिकारी यांनी ती मान्य केली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प