लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी चा लाभ मिळणार नाही ! कृषि विभागाच्या आकडेवारी ने अतिवृष्टी च्या नुकसान भरपाई पासून लोणार ला वगळले!
मेहकर सिंदखेड मध्ये अतिवृष्टी मात्र लोणार मध्ये अतिवृष्टी नाही!
(योगेश शर्मा)
बुलढाणा : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेकऱ्यांच्या हातातील खरिपाची पिके डोळ्यासमोर नासाडी झाल्यानंतरही कृषी विभागाने शासनाला पाठवलेल्या चुकीच्या माहिती मुळे शासनाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदत वातपातून लोणार तालुक्याला वगळल्याने तालुक्यातील शेकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यांचे काम कृषी विभागाने केल्याची संतप्त भावना नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा हृदय पिळवटून टाकणाºया आहेत. निसर्गाने अनेकांची स्वप्ने उद्ध्वस्त केली आहे. आशा परिस्थितीत नुकसान भरपाई भरुन निघण्याकरीता मायबाप सरकारने नुकसान ग्रस्तांच्या मनात सना सुदीच्या काळात आशेचे व उमेदीचे दिवे लावणे गरजेचे आहे. मात्र शासकीय यंत्रणांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचे केलेल्या चुकीच्या सर्वे मुळे अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतेच जाहीर केलेल्या मदती पासून लोणार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वंचित राहावे लागणार आहे. लोणार तालुक्यात प्राथमिक अवस्थेत हाती आलेल्या माहितीनुसार सुमारे एक लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील मुंग,उडीद, सोयाबीन, ज्वारी, सह अन्य पिके जमीनदोस्त झाली आहे शेतात टोंगळ्या एवढे पाणी साचल्याने डोळ्यासमोर अपार मेहनतीने फुलवलेल्या हिरव्या स्वप्नांचा चिखल झालेला पाहून तालुक्यातील पांग्रा डोळे येथील एका तरुण शेतकऱ्याने गळ्याभोवती दोरखंडाचा फास आवळून आपली जीवनयात्रा संपवली अतिवृष्टीमुळे पिकांची झालेल्या नासाडी मुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग हादरला आहे एवढी भयावह परिस्थिती पाहूनही अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे सर्वे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करणाऱ्या यंत्रणेने शासन स्तरावर चुकीची माहिती पाठवून तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे केलेले पाप पुढील काळात शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहे.
जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लोणार तालुक्यातील मूग,उडीद ही पिके सुरवातीलाच हातची गेली तर परतीच्या पावसाने सोयाबीनच्या उभ्या पिकांच्या रोपाला लागलेल्या शेंगा मधील दाण्यांना कोंब फुटले असतानादेखील सर्वेसाठी गेलेल्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी यांनी जाणूनबुजून केलेल्या दुर्लक्षामुळे शासन दरबारी योग्य ते पंचनामे सादर न केल्याने लोणार तालुक्यामध्ये लोणार तालुक्यातील सहाही मंडळात अतिवृष्टी होऊनही अतिवृष्टीत झाली नसल्याची चुकीची नोंद महसूल दरबारी झाल्याची माहिती शासनाला सादर केल्याने लोणार तालुक्यातील हजारो शेतकरी शासनाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई साठी मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहणार आहेत.
ज्यांच्यावर आपतिग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याची खरी जवाबदारी होती त्यांनीच या आपत्तीकडे गांभीर्याने लक्ष पुरविले नाही, परिणामी नुकसानग्रस्तांच्या व्यथा-वेदनांना कोणी वालीच तालुक्यात उरला नाही. महत्त्वाचे म्हणजे, होत्याचे नव्हते करून टाकणारी ही आपत्ती असतांना देखील सर्वे करणाऱ्या शासकीय यंत्रणांनी पाठविलेल्या चुकीच्या माहिती मुळे तालुक्यात अतिवृष्टीच झाली नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत ही मिळणार नाही. लोणार तालुका हा मेहकर व सिंदखेड राजा या तालुक्याच्या मध्यभागी आहे. सिंदखेडराजा व मेहकर तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होते मात्र लोणार मध्ये कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासन दरबारी अल्प पावसाची नोंद घेतल्या गेली आहे. गत वर्षीदेखील तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे पीक पावसासोबत वाहून गेले होते त्या आघातामधून सुटत नाही तोच यावर्षी एकीकडे कोरणा चे संकट दुसरीकडून नैसर्गिक संकट अशा आस्मानी आणि सुलतानी संकटांनी खचलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी दहा हजार तर फळ बाग शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत दिवाळी पूर्व दिली जाणार असल्याची घोषणा 24 ऑक्टोबर रोजी केली खरी मात्र केवळ कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे अतोनात नुकसान होऊनही या मदतीपासून लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. एवढे मात्र खरे
⏹️चुकीचा सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय करणार नाही.
लोणार तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले परंतु नुकसानी चा सर्वे करणाऱ्यां महसूल, कृषी, पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यां पैकी ज्यांनी कोणी शासन दरबारी चुकीची माहिती सादर केली आहे आणि ज्यांच्या मुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या मदतीपासून वंचित राहावे लागनार आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यां ची कोणतीही गय करणार नसून शासनाची मद्त न मिळाल्यास संबंधित विभागकडून शेतकऱ्यांच्या नुकसानिची भरपाई करून घेऊ
- आ.डॉ संजय रायमुलकर, आमदार मेहकर विधानसभा मतदार संघ
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प