मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांच्या समर्थनात देशातील 18 प्रमुख पक्षांनी भारत बंदला समर्थन दिले होते, यावर भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षावर तीव्र आगपाखाड केली असुन शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच फडणवीस म्हणाले की रा.का. अध्यक्ष शरद पवार देशाचे कृषीमंत्री असताना त्यानी या कायद्याची शिफारास केली होती असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.