बेंगळुरू: कर्नाटक राज्यातील चिक्कबेट्टहळ्ळी येथे रामनवमीच्या दिवशी काही हिंदू त्यांच्या चारचाकी वाहनातू बसून ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या जिहादी तरुणांनी या चारचाकीला अडवून ‘येथे जय श्रीराम म्हणायचे नाही, तर केवळ ‘अल्लाहू अकबर’ म्हणायचे’, अशी धमकी देवून शिवीगाळ केली.
त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. जिहाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक हिंदू तरुण घायाळ झाला. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर ३ जिहादी तरुणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.