सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हिंदी ‘पाक्षिक सनातन प्रभात’चा 21 वा वर्धापनदिन सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न !

भारतवर्ष हिंदु राष्ट्र झाले, तर संपूर्ण विश्‍वाचे कल्याण होईल ! - पू. (डॉ.) शिवनारायण सेन, संपादक, मासिक ‘ट्रूथ’*

Snehal Joshi . सौजन्य- हिंदु जनजागृती समिती,
  • Jan 18 2021 2:47PM
हिंदु धर्म हा वैज्ञानिक चिंतनाने समृद्ध आहे. भारतात संगीत, विद्या, स्थापत्त्य, गणित आदी अनेक विषयांवर प्राचीन काळापासून संशोधन झाले आहे. तामिळनाडूमधील प्राचीन श्री वराह मंदिरात गर्भावस्थेतील विविध आकृत्या दगडावर कोरलेल्या आहेत; म्हणजे आपल्या पूर्वजांना त्या विषयाचे ज्ञान होते. असे अनेक विषयांचे ज्ञान आपल्याकडे होते. त्यामुळे आध्यात्मिक ज्ञानाने जागतिक कल्याणाला धारण करणे आणि त्याचे पोषण करणे, ही क्षमता केवळ भारतामध्येच आहे. एकदा भारतवर्ष धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र झाले, तर संपूर्ण विश्‍वाचे कल्याण होणार आहे, असे प्रतिपादन ‘ट्रुथ’(Truth) मासिकाचे संपादक आणि बंगाल येथील ‘शास्त्र धर्म प्रचार सभे’चे सहसचिव पू. (डॉ.) शिवनारायण सेन यांनी केले. ते ‘ऑनलाईन’ पार पडलेल्या ‘हिंदी पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. त्यानंतर हिंदी ‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस्’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी आशीर्वादरूपी दिलेल्या शुभसंदेशाचे वाचनही या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमात सनातन प्रभातचे वाचक राजस्थान येथील प.पू. स्वामी संवित सोमगिरी महाराज, सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा, ‘लष्कर-ए-हिंद’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम ‘यू-ट्यूब’ आणि ‘फेसबूक’ यांच्या माध्यमांतून 26,444 लोकांनी पाहिला. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता आणि ‘सनातन प्रभात’चे सहाय्यक संपादक श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘द्रष्ट्या संतांनी 12 वर्षांपूर्वीच एक बातमीच्या निमित्ताने ‘‘तिसर्‍या महायुध्दाला चीन कारणीभूत ठरेल’’, असे सांगितले होते. तसेच ‘‘चीनी वस्तूंवर बहिष्कार घाला’’, अशी भूमिका मांडली होती. आज गलवान-लडाख प्रकरणांवरून चीन आणि भारत यांमधील तणावाची स्थिती पाहता, या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रातून सुटका झालेल्या हिंदु युवतींचे अनुभव आणि बातम्या यांचे संदर्भ घेऊन हिंदु जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथाच्या 11 भाषांत 4 लक्ष प्रती देशभरात वितरीत झाल्या. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आदी राज्यांत केलेला ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा हा आम्ही त्या वेळी केलेल्या जागृतीचा परिणाम मानतो. हिंदूंवर होणार्‍या आघातांच्या विरोधात हिंदूंना जागृत करण्याचे काम ‘सनातन प्रभात’ने केले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर पूर्व भारतातील प्रचारक पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘मंदिर सरकारीकरण कायदा, एन्.सी.ई.आर्.टी. पाठ्यपुस्तकांतील इतिहासाचे विकृतीकरण, कुंभमेळ्याच्या वेळी रेल्वेकडून लावण्यात आलेले अधिभार, तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जगन्नाथ यात्रा स्थगित करण्याचा न्यायालयाचा आदेश या आणि यांसारख्या अनेक विषयांमध्ये समितीने लढा दिल्यामुळे हिंदूंना यश मिळाले आहे. त्यामुळे समाजही याविषयी जागृत झाला आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार