सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना महामारीच्या काळातील श्री गणेशमूर्तीचे आगमन, पूजन आणि विसर्जन !

सामान्यांसह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या मनात आहे. सध्या कोरोनाच्या वा तत्सम आपत्काळातही हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय नेमके कोणते आहेत ? याविषयी जाणून घेण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात येथे दिली आहेत.

Snehal Joshi . सौजन्य- सनातन संस्था
  • Aug 21 2020 11:45PM
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी घरातून बाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. त्या अनुषंगाने घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव नेमका कसा साजरा करावा ?, असा प्रश्‍न सामान्यांसह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींच्या मनात आहे. सध्या कोरोनाच्या वा तत्सम आपत्काळातही हिंदु धर्माने धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. ते पर्याय नेमके कोणते आहेत ? याविषयी जाणून घेण्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत प्रश्‍नोत्तराच्या स्वरूपात येथे दिली आहेत. १. प्रतिवर्षी गणेशोत्सव उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. या वर्षी कोरोना महामारी आहे. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ (दुसर्‍यापासून अंतर ठेवणे), प्रवासबंदी इत्यादी बंधने आहेत. अशा स्थितीत घरोघरी होणारे श्री गणेशपूजन असो कि सार्वजनिक गणेशोत्सव असो, यांना मर्यादा येणार आहेत. या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते ? उत्तर – कोरोना महामारीमुळे या वर्षी घरोघरी होणारे श्री गणेशपूजन किंवा सार्वजनिक गणेशोत्सव यांना मर्यादा आहेत. प्रतिवर्षी होणारे श्री गणरायांचे आगमन हा आपल्या सर्वांसाठी आनंदोत्सव असतो. मुळातच मानव हा उत्सवप्रिय असल्याने प्रतिवर्षी उत्सव जवळ जवळ येऊ लागल्यानंतर आपल्या मनात उत्कंठा असते. या वर्षी महामारीमुळे काही प्रमाणात सामाजिक बंधने आहेत. अशा स्थितीत ‘धर्मशास्त्र काय सांगते ?’, या विषयी जिज्ञासा असणे स्वाभाविक आहे. अनेक वेळा अराजक, दुष्काळ, स्थलांतर, महामारी, युद्धजन्य स्थिती इत्यादी आकस्मिक कारणांनी धर्माचरण करण्यास बाधा येते. अशा स्थितीत सनातन धर्माने आपद्धर्म सांगितला आहे. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’, म्हणजे आपत्तीत, संकटकाळात आचरण्याचा धर्म. आपद्धर्म केवळ आपत्तीपुरता मर्यादित असतो. आलेली आपत्ती टळून गेल्यावर किंवा समाजाची घडी नीट बसल्यावर पुन्हा परिशुद्ध धर्म अंगीकारावा, असा नियमही धर्मशास्त्रात सांगितलेला आहे. सध्या जगभरात कोरोना महामारीमुळे सर्वत्रच लोकांच्या दळणवळणावर अनेक बंधने आली आहेत. भारतातही विविध राज्यांमध्ये दळणवळण बंदी (लॉकडाऊन) आहे. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प असला, तरी तेथे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर अनेक बंधने आहेतच. त्यामुळे गणेशोत्सव नेहमीप्रमाणे सामूहिकरित्या करण्यावर बंधने आली आहेत. अशा काळातही आपद्धर्म लागू आहे. २. सध्या कोरोना महामारी असल्याने श्री गणेशचतुर्थीच्या ऐवजी माघी गणेशजयंतीला मूर्ती प्रतिष्ठापना करावी का ? उत्तर – ‘श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजन हे भाद्रपद मासात करावे’, असे धर्मशास्त्र सांगते. चातुर्मासाच्या काळात म्हणजे आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या १२० दिवसांत विनाशकारक आणि तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्र्रता अधिक असते; म्हणूनच या काळात हिंदूंचे अनेक सण-उत्सव येतात. जेणेकरून सण, उत्सव, व्रते यांच्या माध्यमातून व्यक्ती ईश्‍वराच्या अनुसंधानात राहील. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीच्या दिवशी गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असल्याने यमलहरींचीही तीव्रता अल्प व्हायला साहाय्य होते. त्यामुळे या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. ३. बाजारात शाडूची मूर्ती मिळणे कठीण आहे. अशा वेळी काय करावे ? उत्तर – सध्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती बाजारात मिळतात. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची मूर्ती धर्मशास्त्रसंमत नाही. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ हे रज-तमप्रधान असल्याने त्यापासून बनवलेल्या मूर्तीमध्ये गणेशाची पवित्रके आकृष्ट होत नाहीत. श्री गणेशमूर्ती चिकणमाती किंवा शाडू माती यांपासून बनवावी, असा शास्त्रविधी आहे. एका मतानुसार पार्वतीमातेने बनवलेला  श्री गणेश हा महागणपतीचा अवतार आहे. पार्वतीमातेने मृत्तिकेचा आकार करून त्यात श्री गणेशाचे आवाहन केले. स्कंद पुराणामध्ये श्रीकृष्णाने धर्मराजाला सिद्धिविनायक व्रत करण्यास सांगितले आहे. या वेळी मूर्ती कशी असावी, याचे सविस्तर वर्णन आहे. ‘स्वशक्त्या गणनाथस्य स्वर्णरौप्यमयाकृतिम् । अथवा मृन्मयी कार्या वित्तशाठ्यं न कारयेत् ॥’ – स्मृतिकौस्तुभ (मूळ संदर्भ : स्कंदपुराण, सिद्धिविनायक कथा आणि पूजा) या श्‍लोकाचा अर्थ आहे की, ‘सिद्धीविनायकाच्या पूजेसाठी स्वतःच्या ऐपतीप्रमाणे सोने, रूपे (चांदी) किंवा माती यांची मूर्ती बनवावी. यामध्ये कंजूषपणा करू नये.’ त्यामुळे या व्यतिरिक्त अन्य पदार्थांनी श्री गणेशमूर्ती बनवणे योग्य नाही; मग अशा स्थितीत आपल्याकडे पर्याय काय आहेत, हे आता पाहूया. १. आपण घरीच चिकणमातीची ६-७ इंचाची श्री गणेशमूर्ती बनवू शकतो. २. मूर्ती बनवता येत नसेल किंवा कोरोनाच्या संसर्गामुळे आजूबाजूचा परिसर अथवा इमारत ‘प्रतिबंधित क्षेत्र’ (कंटेन्मेंट झोन) म्हणून घोषित झाले असेल, तर तेथील लोक गणेशतत्त्वाचा लाभ व्हावा, यासाठी आपल्या घरातील श्री गणेशाची मूर्ती अथवा श्री गणेशाच्या चित्राचे षोडशोपचार पूजन करू शकतात. हे पूजन करत असतांना पूजेतील ‘प्राणप्रतिष्ठा’ हा विधी करू नये. ‘प्राणप्रतिष्ठा’ केलेली मूर्ती नंतर विसर्जित करावी लागते. यासाठी ही दक्षता घ्यावी. ४. सध्या पंचगव्य, शेण यांची मूर्ती घरी बसवण्याचा पर्याय दिला जात आहे. हे शास्त्रसंमत आहे का ? उत्तर – सोने, रूपे (चांदी) किंवा माती यांची श्री गणेशमूर्ती बनवावी, असे शास्त्र सांगते. त्यामुळे पंचगव्य किंवा शेणाची मूर्ती आदी वस्तूंपासून बनवलेली श्री गणेशमूर्ती धर्मशास्त्रसंमत नाही. ५. शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी, हे शास्त्रसंमत आहे का ? उत्तर – असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरेतर हा धर्म न मानणार्‍या पर्यावरणवाद्यांचा प्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही. ६. बाजारातून आणलेली मूर्ती ‘सॅनिटाइझ’ करावी का ? उत्तर – बाजारातून मूर्ती आणतांना आदल्या दिवशीच घरी आणावी आणि १२ घंटे घरातील सात्त्विक ठिकाणी अलगीकरण करून ठेवावी. म्हणजे ती कोरोनामुक्त होईल. मूर्ती सॅनिटाइझ करू नये. सॅनिटायझरमधील रासायनिक द्रव्यांमुळे मूर्तीचा रंगभेद होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे अध्यात्मशास्त्राच्या नियमानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्रित असतात. या नियमानुसार जरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली नसेल, तरी तिच्यात ते देवतेचे तत्त्व असते. मूर्तीमध्ये रंगभेद झाल्याने त्यातील देवतेच्या तत्त्वाची हानी होऊ शकते. ७. कोरोना महामारीमुळे पुरोहितांना घरी बोलावण्यास मर्यादा आहेत. अशा स्थितीत काही ठिकाणी पुरोहित ‘ऑनलाईन’ माध्यमातून पूजा सांगणार आहेत. अशी ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ? उत्तर – सध्याच्या संकटकाळात एकमेकांकडे जाता येत नसल्याने ‘ऑनलाईन’ पूजा हा एक चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते. पुरोहितांच्या अनुपस्थितीत गणेशपूजन शास्त्रोक्त पद्धतीने करता यावे, यासाठी सनातन संस्थेने ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ हे भ्रमणभाष अ‍ॅप विकसित केले आहे. त्यामध्ये श्री गणेशाची विधिवत् पूजा सांगण्यात आली आहे. ते ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून आपणही घरच्या घरी श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. ८. दीड दिवसच गणपति बसवा, असा सल्ला दिला जात आहे. असे करावे का ? उत्तर – सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला मातीची श्री गणेशमूर्ती करतात. ती मूर्ती डाव्या हातावर ठेवून तेथेच मूर्तीची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपति बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे. ९. कोरोना महामारीच्या काळातील मूर्ती विसर्जनाची बंधने लक्षात घेऊन काय करावे ? उत्तर – मूर्ती विसर्जनाच्या वेळी जलस्रोतांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सध्या कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतराचे) सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे. यासाठी श्री गणेशमूर्ती आणतांना आणि विसर्जन करतांना घरातील मोजक्याच व्यक्तींनी जावे. मूर्ती विसर्जन करतांना आपल्या घराजवळील तलाव किंवा विहीर यांमध्ये विसर्जन करावे. या काळात गर्दी होण्याचा धोका अधिक असल्याने शासनाने कोरोनाच्या संदर्भात सांगितलेल्या मार्गदर्शक सूत्रांचे तंतोतंत पालन करणे, हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. एखाद्या भागात कोरोना संसर्गामुळे अडचण निर्माण झाली असल्यामुळे तेथे गर्दीच्या ठिकाणी जाऊन मूर्तीविसर्जित करणे शक्य नाही, अशा वेळी काय करावे ? असा आपल्या मनात प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. घरात ६ – ७ इंचाची लघु श्री गणेशमूर्ती पूजन केली असल्यास दुष्काळ किंवा आपत्कालीन परिस्थितीत उत्तरपूजेनंतर श्री गणेशमूर्ती घराबाहेर न्यावी. तुळशी वृंदावनाच्या जवळ किंवा अंगणात मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्ती विसर्जित करावी. शहरात रहाणार्‍यांना तुळशी वृंदावन किंवा अंगण उपलब्ध नसल्यास त्यांनी घरातच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मूर्तीचे विसर्जन करावे. मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळल्यानंतर ते पाणी आणि माती पायदळी येणार नाही, अशा रितीने शमी, रुई, औदुंबर, आपटा, वड, पिंपळ यांसारख्या सात्त्विक वृक्षांना घालावी. मोठी श्री गणेशमूर्ती पूजन केली असल्यास ती देवघराजवळ किंवा अन्य सात्त्विक ठिकाणी ठेवावी. या मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही. धूळ बसू नये; म्हणून ती खोक्यात किंवा आच्छादनाने झाकून ठेवावी. पुढे श्राद्धपक्ष पूर्ण झाल्यानंतर गर्दी नसतांना ती मूर्ती वहात्या पाण्यात विसर्जित करावी. संकटकाळाच्या दृष्टीने आम्ही गणेशभक्तांना सूचना करू इच्छितो की, या संकटकाळात शक्यतो छोटी श्री गणेशमूर्तीच पूजावी. मोठी श्री गणेशमूर्तीचे पूजन करण्याचे शक्यतो टाळावे. १०. या वर्षी कोरोना महामारी असल्याने श्री गणेशमूर्ती पुढील वर्षी विसर्जित करावी का ? उत्तर – श्री गणेशमूर्तीची उत्तरपूजा झाल्यानंतर तिच्यातील गणेशतत्त्व निघून जाते, असे शास्त्र आहे. त्यामुळे कोरोना महामारीचे संकट अल्प झाल्यावर ती मूर्ती विसर्जित करावी. तोपर्यंत ती मूर्ती आपल्या घरी वस्त्राने झाकून ठेवावी. येथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही. ११. धातूची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यास विसर्जनाचे शास्त्र काय ? उत्तर – सिद्धिविनायकाचे व्रत म्हणून सोने किंवा रूपे या धातूंची मूर्ती प्रतिष्ठापना केल्यानंतर ती मातीच्या मूर्तीप्रमाणे विसर्जित करावी. जे नियम मातीच्या मूर्तीला आहेत, तेच नियम धातूच्या मूर्तीला आहेत. १२. प्रदूषित नदीत मूर्तीविसर्जन करणे योग्य आहे का ? उत्तर – ‘श्री गणेशमूर्तींचे नदीमध्ये वहात्या पाण्यात किंवा विहिरी, तलाव आदी नैसर्गिक जलाशयात विसर्जन करावे’, असे शास्त्र सांगते. नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने मूर्तीतील गणेशतत्त्व पाण्यासह सर्वदूर पसरून त्याचा चराचर सृष्टीला लाभ होतो. आता प्रश्‍न असा आहे की, नदी प्रदूषित असेल, तर काय करावे ? या प्रश्‍नाच्या उत्तराला २ – ३ पैलू आहेत. खरे तर नदीचे प्रदूषण रोखण्याचे मुख्य दायित्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे आहे. नदीचे मुख्य प्रदूषण प्राधान्याने त्यामध्ये मिसळले जाणारे दूषित रासायनिक पाणी, तसेच विनाप्रक्रिया सोडले जाणारे मैलापाणी यांमुळे होते. नदीचे प्रदूषण करणार्‍या घटकांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली, तर नदीची निर्मळता अबाधित राहू शकते; पण साधारण अनुभव असा आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे धार्मिक विधी पार पाडण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदी प्रदूषणरहित करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक ती पावले उचलावीत, विसर्जनाच्या दिवशी नदीला अधिक पाणी सोडावे, यासाठी नागरिकांनीच शासनदरबारी पाठपुरावा घ्यावा. आता भाविकांच्या दृष्टीने विचार केला, तर आपल्या क्षेत्रात नदी अधिक प्रदूषित असेल, तर ज्या ठिकाणी नदीचे पाणी चांगले आहे, त्या ठिकाणी जाऊन श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. शास्त्रानुसार आचरण करण्यास प्राधान्य द्यावे. १३. काही आध्यात्मिक संस्था निर्माल्य गोळा करतात आणि ते खाणीत टाकतात. असे शास्त्रसंमत आहे का ? उत्तर – असे करणे शास्त्रसंमत नाही. आपल्या क्षेत्रात आध्यात्मिक संस्था अशा प्रकारची धर्मविरोधी कृती करत असतील, तर त्यांना वैध मार्गाने विरोध करायला हवा. एरव्ही श्री गणेशमूर्तीच्या समवेत निर्माल्याचेही विसर्जन करायचे असते. निर्माल्यातील चैतन्य पाण्यात विसर्जित झाल्यामुळे पाण्याद्वारे त्या चैतन्याचा समष्टी स्तरावर लाभ होतो; परंतु सध्याच्या आपत्काळात बाहेर जाता येत नसल्याने वैयक्तिक स्तरावर तरी निर्माल्यातील चैतन्याचा लाभ मिळावा, यासाठी निर्माल्य पाण्यात बुडवून काढावे आणि नंतर त्या पाण्याचा वापर स्नानासाठी करावा किंवा ते पाणी अंगणातील फुलझाडांना घालावे. नंतर त्या निर्माल्याचा वापर खतनिर्मितीसाठी करावा. १४. गणेशोत्सव मंडळांनी श्रीगणेशपूजन रहित करणे म्हणजे एक प्रकारे ईश्‍वरी अधिष्ठान नाकारणे गणपति देवता हे या कार्याचे ईश्‍वरी अधिष्ठान आहे. कुठलेही कार्य सफल होण्यासाठी ईश्‍वरी अधिष्ठानाची आवश्यकता असते. त्यामुळे श्री गणेशपूजन रहित करणे, हे एक प्रकारे ईश्‍वरी अधिष्ठान नाकारल्यासारखे होईल. श्री गणेशोत्सव मंडळात श्री गणेशाच्या छोट्या मूर्तीची पूजा करणे आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवणे, या दोन्हीही गोष्टी करणे मंडळाला शक्य आहे. गर्दी होऊ नये; म्हणून ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखले जाईल, अशा पद्धतीने व्यवस्था करणे किंवा ‘ऑनलाईन दर्शना’ची सोय करणे, अशा काही व्यवस्थाही करता येण्यासारख्या आहेत.’ 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार