महा"वसुली" सरकारने मराठा समाजाचा घात केला- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची घणाघाती टीका
मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्याची व ती टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ठणकावले
मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्याची व ती टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी ठणकावले
महा वसुली सरकारने मराठा आरक्षण विरोधात भूमिका घेण्याआधी १०० वेळा विचार करावा- लोणीकरांचा राज्य सरकारला इशारा
मराठा आरक्षणाबाबत पुतना मावशीचे प्रेम दाखवणारे काँग्रेस नेते त्यांच्या सरकारने ०६ वेळा मराठा समाज मागास नसल्याचा अहवाल दिला त्यावर का बोलत नाहीत ? - लोणीकर यांचा सवाल
महाराष्ट्रात महा वसुली सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने महत्त्वाच्या विषयांकडे हेतुपुरस्सर कानाडोळा केला असून मराठा आरक्षणात गद्दारी करून संपूर्ण मराठा समाजाच्या अनेक पिढ्यांचे नुकसान केले आहे राज्याच्या महत्त्वाच्या विषयात सत्ताधारी महावसुली सरकार वारंवार आपली जबाबदारी झटकत असून मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिघाडी सरकार अजिबात गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे कुरघोडी करून सत्ता मिळवली त्या सत्तेचा दुरुपयोग करतात मराठा समाजाची अतोनात हानी व मोठा घात करण्यात आला असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतरही राज्यात एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचा राज्य सरकारचा अधिकार आणि जबाबदारी कायमच आहे. त्यानुसारच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग नेमला होता या आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यांना शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते याच मुद्द्यांवरून माननीय उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला मंजुरी देण्यात आली होती त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मेहनत घेऊन प्रत्येक बाबीवर व्यक्तिशः लक्ष दिले होते परंतु आज मात्र मराठा आरक्षणाकडे केवळ श्रेयवादाच्या माध्यमातून बघितले जात असल्याची टीका देखील यावेळी लोणीकर यांनी केली
भाजपा नेते माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी राज्यसरकारचा खरपूस समाचार घेत मराठा आरक्षण टिकवणे ही राज्य सरकारचीच जबाबदारी असल्याची जाणीव करून दिली. घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्याला मराठा आरक्षणाबाबत अधिकार उरला नाही आणि त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा अशा शब्दात राज्यसरकार वारंवार मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. घटनादुरुस्तीनंतरही राज्याचा आपल्या राज्यासाठी एखादी जात मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मागास ठरविण्याचा व त्याला आरक्षण देण्याचा अधिकार अबाधित आहे, ही बाब राज्यसरकार हेतुपुरस्सर लपवत आहेत. या घटनादुरुस्तीनुसार राज्याच्या मागासवर्ग आयोगाने एखाद्या जातीला मागास ठरविले की त्याचा अहवाल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवायचा, त्यांनी तो राष्ट्रपतींकडे पाठवायचा आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतर कायदा संबंधित राज्यानेच करायचा आहे. ही बाब माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले आहे
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडून किंवा केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाराष्ट्र सरकारचे जबाबदारी संपत नाही सरकारने मराठा समाजाची दिशाभूल ला करतात मराठा आरक्षण टिकविण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलावीत अशी मागणी यावेळी लोणीकर यांनी केली, आवश्यकता असल्यास आघाडी सरकारने नव्याने राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल मिळवावा. सर्वोच्च न्यायालयात गायकवाड आयोगाचे जे मुद्दे फेटाळले गेले असतील त्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकारणापालिकडे जाऊन विचार करावा व मराठा समाज कसा मागास आहे, हे सिद्ध करावे अन्यथा मराठा समाज आघाडी सरकारला कदापि माफ करणार नाही. जनतेच्या विरोधात जाऊ काम केले तर काय होऊ शकते हे पंढरपूरच्या निकालाने दाखवून दिले आहे त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेताना शंभर वेळा विचार करावा असा इशारा देखील यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला.
भाजपा सरकारने घाईघाईने आरक्षण दिले असे म्हणणारे राज्यसरकार तेच आरक्षण उच्च न्यायालयात टिकले व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात देखील मराठा आरक्षण व स्थगिती मिळाली नाही ही बाब जाणीवपूर्वक विसरले आहेत आरक्षण हा जर केंद्र सरकारचा विषय असेल तर मग याआतापर्यंत कित्येक वर्ष केंद्रात व राज्यात काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार असताना मराठा आरक्षण का दिले नाही असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत पुतना मावशीचे प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेस आजच्या नेत्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात स्वातंत्र्यानंतर ०६ वेळा मागास आयोगांनी मराठा समाज मागास नसल्याचा अहवाल दिला त्यावेळेस गप्प का बसले असा सवाल उपस्थित केला.काँग्रेस सत्तेत असलेल्या काळात केंद्र सरकारला कधी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही ? असे प्रश्न विचारले ऐकिवात नसल्याचे लोणीकर म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते म्हणून या सर्वांनी आज पर्यंत मराठा आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले दुर्दैवाने शिवसेना देखील आज मराठा आरक्षणाला विरोध करणार्या लोकांच्या दावणीला जाऊन बसली आहे अशी टीका देखील लोणीकर यांनी यावेळी केली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प