दिल्ली : शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. तसेच अकाली दल (डेमोक्रेटिक) चे प्रमुख खासदार सुखदेवसिंग धिंदसा यांनी देखील कृषी कायद्याच्या निषेधार्थ आपला पद्मभूषण परत करण्याची घोषणा केलीय.
पंजाबचे मा मुख्यमंत्री तथा अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल यांनी म्हणाले की, "मी जे काही ते आहे शेतकरी आणि जनतेमुळे आहे. आज जेव्हा त्यांचा सन्मान केला जात नसेल , तेव्हा मला पद्मविभूषण पुरस्कार ठेवण्याचा अधिकार नाही, अस म्हणत प्रकाश सिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला आहे. यांच्याव्यतिरिक्त नुकताच पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार विजेता बास्केटबॉल खेळाडू सज्जनसिंग चिमा आणि अर्जुन पुरस्कार हॉकीपटू राजबीर कौर यांनी देखील पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
देशाच्या विविध भागातुन आलेले हजारो शेतकरी आठवडाभरापासून दिल्लीच्या सीमेवर येऊन थांबले असुन केंद्र सरकारने नुकत्याच राबवलेल्या कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठकही झाल्या आहेत, मात्र अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.