राज्य सरकारने दि.07 मार्च पर्यंत राज्यात कोविड नियम सक्तीने पालन करण्याची तयारी दाखविली असून यात अनेक समारंभ रद्द झाले. मात्र राज्यात लाखोच्या संख्येत लग्न समारंभाची तारीख निश्चित झाली असून राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधामुळे लग्नघरी शोककळा पसरली की काय? अशी स्थिती आहे. कारण वधू-वरांच्या पालकाने हॉल बुक केले, हॉल, कटरर्स, बँडसह अनेकांना अॅडव्हांस देखील यांनी दिलेला असून अनेकांनी लग्नपत्रिका देखील वाटप केलेल्या आहेत.
परंतु आता हॉलचे संचालक स्वत: बुकिंग रद्द करण्यासाठी या पालकांवर दबाव टाकत आहे. अशा परिस्थितीत या ठरलेल्या लग्न समारंभाला कोविडच्या नियमासह समारंभाची मुभा द्यावी. अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे व विकास कुंभारे यांनी केलेली आहे.
या मागणीसह दोन्ही आमदार मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट देखील घेणार आहेत.