काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत . त्यामुळं त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाला आहे.
भाजपच्यावतीनं विधिमंडळाबाहेर आणि सभागृहात आक्रमक आंदोलन केलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या मागणीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सध्या आरोप आहेत. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, याच्याशी आम्ही सहमत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.
याशिवाय इकबाल मिर्चीकडून भाजपला डोनेशन मिळाल असून भाजप पक्ष विसर्जित करणार का, असा सवाल नाना पटोले म्हणाले.
महा विकास आघाडीची पताका सांभाळताना पटोले म्हणाले की नवाब मलिकांच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप आहेत. कोर्टानं अगर ते सिद्ध झालं तर निश्चितपणे त्यांना मंत्रिमडळात राहण्याचा अधिकार नाही याच्याशी सहमत आहे.
मात्र काँग्रेसची पताका सांभाळत पटोले म्हणाले महाराष्ट्रात कोणावरही आरोप करायचं, दुषित वातावरण करायचं त्याची बदनामी करायची, हे भाजपकडून राजकारण सुरु आहे त्यावर विश्वास कोण ठेवणार.