पाकिस्तान: पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळओक केली आहे. ‘भारत हा आमचा कट्टर प्रतिस्पर्धी आहे’, असे विधान त्यांनी केले आहे.
जनरल मुनीर यांनी फेब्रुवारी २०१९ च्या बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई आक्रमणाचा संदर्भ देत म्हटले की, आमच्या वायूदलाने भारतीय लढाऊ विमान पाडले होते. पाकिस्तान काश्मीरला नैतिक आणि राजनैतिक पाठिंबा देत राहील.