कोल्हापूर: भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये राज्यघटनेच्या अंतर्गत समान नागरी कायद्याची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून नोंद आहे. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा येत नाही, तोपर्यंत महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत. त्यामुळे सर्वाेच्च परंपरांचे पालन करत समान नागरी कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली.
माधव भंडारी कोल्हापूर येथे भाजपच्या ‘लोकसभा २०२४’ च्या संकल्प पत्राच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.