नवी दिल्ली : कृषी कायद्याला विरोध करत देशातील असंख्य शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला 'भारत बंद' पुकारण्यात आला आहे. गेली 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकीनंतर ही कोणताही निकाल लागलेला नाहीय. येत्या 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार असुन अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला 'भारत बंद' कसा होईल, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. दरम्यान या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यासह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचा पाठिंबा असल्याच प्रदेशध्याक्ष जयंत पाटील यांनी म्हंटल आहे.
''भारत बंद'' दरम्याण काय सुरु राहणार
राजकीय पक्ष सह या बंदला अनेक बॅंक कर्मचारी संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए)नं म्हटलंय की, सरकारने पुढं येऊन देश आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या मागण्यांवर विचार करुन समाधान केलं पाहिजे.तर बॅंक यूनियन्सने सरकारला लवकरात लवकर या मुद्द्यावर तोडगा काढावा असं आवाहन केलं आहे.