राम मंदिराच्या पुर्णत्वानं अयोध्येची सांस्कृतिक आणि आर्थीक भरभराट होईल
सध्या अयोध्या नगरी एखाद्या नव वधूप्रमाणे सजली आहे. इथल्या नागरिकांनीही राम मंदिराच्या निर्माणाबाबत समाधान व्यक्त केलं आहे.
राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागल्यानंतर त्यांच्या निर्मितीच्या चर्चांना उधाण आलं. 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचा सोहळा पार पडतोय, यासारखा आनंदाचा क्षण कोणताच नसल्याचं अनेक भाविकांनी व्यक्त सांगितलं.
सध्या अयोध्या नगरी एखाद्या नव वधूप्रमाणे सजली आहे. इथल्या नागरिकांनीही राम मंदिराच्या निर्माणाबाबत समाधान व्यक्त केलं आहे. श्री राम मंदिराच्या निर्माण कार्याचा भूमीपुजन सोहळा मूर्त रुपात येऊ घातला आहे . अशात अयोध्या नगरी सजवण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष राम मंदिराचा मुद्दा देशभर गाजत होता, त्यात अयोध्या मात्र होरपळली जात होती. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता श्री राममंदिर निर्माण कार्य मार्गी लागत असल्यानं इथल्या लोकांनी समाधान व्यक्त केल आहे.
अयोध्येनं राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आजवर अनेक वादळं झेलली. बाबरी मशिद ते रथयात्रा असा संघर्ष पाहिला. आता मात्र पाहिलेलं स्वप्न पुर्णत्वास जात असल्यानं नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. राम मंदिराच्या पुर्णत्वानं अयोध्येची सांस्कृतिक आणि आर्थीक भरभराट होईल, अशी ही अपेक्षा पर्यटन विभाग आणि नागरिकां तर्फे व्यक्त केली जात आहे.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प