कोरोना महामारीच्या संकटानंतर या 2021 च्या बजेटवर जनतेच्या आशा अपेक्षा निर्भर होत्या त्या दृष्टिकोणातुन हे बजेट सर्वार्थाने पोषक समर्थ व प्रभावी आहे यात शंका नाही, कृषि क्षेत्राला प्रधान्य, त्यासाठीच्या तरतुदी, तर ग्रामीण अर्थव्यवस्था ज्यांत ग्रामीण, व्यवसाय ग्रामीण आरोग्य, शिक्षा प्राथमिक सोयीकडे लक्ष पुरविले आहे.
रस्त्यांच जाळ मोठ करण्यासाठी 5 लक्ष कोटीची तरतुद हे अत्यंत दुरदर्शी आणि गतिशील देणारा निर्णय आहे.
कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटीची तरतुद हे निश्चितच महत्वाच पाहुल आहे.
जी.एस.टी. चे उत्पन्न वाढल, हे लक्षात घेता! देशातील व्यापार पुर्ववत् अतिशय गतिमान ठरतय हे लक्षात येतेय.
त्याच प्रमाणे नागपूरचा विकास करण्यासाठी नागपूर मेट्रो रेल करीता 5976 करोड मंजूर कलेले आहे हे नागपूरकरासांठी अतिषय आनंदाची गोष्ट आहे. तसेच प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेत 64 हजार 180 कोटीचे बजेट आहे.
अश्या अनेक विविध क्षेत्रात मोठे निर्णय घेवुन प्रगतीशील बजेट तयार केलेले आहे.