अहिल्यानगर: महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना देखील काही समाज कंटक त्या कायद्याची पायमल्ली करत आहे. कत्तखान्याच्या ठिकाणी पोलीस स्टेशन कडून व एल.सी.बी.च्या पथका कडून अनेकदा कायदेशीर कर्यवाही करण्यात आल्या आहेत.
तरी देखील त्यांच्या मध्ये कुठलीही सुधारणा झाली नाही. ते कसाई नेहमी राज रोस पणे दररोज हजारो गोवंशाची कत्तल करत आहे. त्यांना प्रशासनाची भिती वाटत नाही. हे दुर्दैव आहे.तरी आपणास विनंती आहे. वरील सर्व ठिकाणचे कत्तलखाणे त्वरीत भुईसपाट करण्यात यावे. या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे वतीने बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडारी, मानद पशु अधिकारी ऋषिकेश भागवत यांनी दिले आहे. जर प्रशासनाने कठोर पावले उचलून कारवाई केली नाही.तर आम्ही न्याय देवतेकडे न्याय मागु व महाराष्ट्रातील लाखो गोरक्षक व वारकरी संप्रदाय रस्त्यावरर्ती उतरुन बजरंग दल आक्रमक भुमीका घेतील.
यावेळी साहिल पवार, सनी थोरात, शिवराज पवार, ऋषिकेश जुम्मीवाले, सचिन पवार आदी बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते