फुले-शाहू-आंबेकर यांच्या विचारांवर नितांत श्रद्धा असलेला व त्या विचारांना स्वतः आचरणात आणणारा पुराेगामी विचाराचा अग्रणी याेद्धा अॅड. एकनाथराव साळवे यांच्या रुपाने गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी शाेकसंवेदना व्यक्त केला आहे.
अॅड. एकनाथराव साळवे यांनी जीवनभर काँग्रेसची पताका खांद्यावर घेतली. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र हाेता.
काँग्रेसचा विचार करताना त्यांनी पुराेगामी फुले शाहू-ुआंबेडकरवादालाही आपलेसे केले. एवढेच नव्हे तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर एवढा प्रभाव हाेता की, त्यांनी बाैद्ध धम्माचा स्वीकार केला.
व्यासंगी नेता म्हणून ते मला माहित आहे असेही ते म्हणाले.
चंद्रपूरला गेल्यानंतर त्यांच्या ग्रंथालयाला भेट देणे हा एक वेगळा अनुभव हाेता. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस परिवाराचेच नुकसान झाले नाही तर पुराेगामी विचारांना आचरणात आणणारा एक अग्रणी याेद्धा आम्ही गमावला आहे, असेही डाॅ. राऊत यांनी शाेकसंदेशात म्हटले आहे.