नागपूर ---- यावर्षी राज्यातील जलाशयांमध्ये विपुल जलसाठा असल्याने पिण्याच्या आणि बाह्य वापराच्या पाण्याची चिंता मिटणार. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जलसाठा तीन पट जास्त आहे. राज्यात जलाशयांमध्ये पाण्याच्या साठ्या विषयीचा अहवाल राज्य सरकारने शनिवारी जाहीर केला.
गेल्या तीन ते चार वर्षापासून राज्याला सातत्याने पाण्याच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांमध्ये विशेष रेल गाड्यांनी पाण्याचा पुरवठा करावा लागत होता. या तुलनेत यंदाची स्थिती अतिशय समाधानकारक आहे. गेल्या वर्षी मान्सूनचा चांगला पाऊस झाल्याने आणि भूमिगत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात आल्याने हे शक्य झाले आहे.
गतवर्षीचा साठा---
गेल्या वर्षी याच दिवशी या सर्व प्रकल्पांमध्ये जलसाठा 14.8 टक्के इतका होता. याकडे या अहवालातून लक्ष वेधले गेले आहे.
औरंगाबादेतही समाधानकारक स्थितीची निर्मिती--- औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी हे जिल्हे गेल्या वर्षी तहानलेले होते. या वर्षी तशी स्थिती नाही..
असा आहे एकूण महाराष्ट्राचा जलसाठा
राज्यातील एकूण जलप्रकल्प---3,267
सध्याचा जलसाठा दशलक्ष क्यू मी---16,472.12
एकूण शमता---40,897.15
क्षमतेच्या तुलनेत साठवण---40.28 टक्के