नवी दिल्ली, 02 मे : कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या वाढत्या घटनांमध्ये केंद्र सरकारनं इतर राज्यामध्ये अडकलेल्या प्रवासी मजुरांना लॉकडाऊन (Lockdown 3.0) वाढविण्यापूर्वी विशेष गाड्यांमधून त्यांना त्यांच्या राज्यात नेण्याचे निर्देशित दिले आहेत. रेल्वेनं चालवलेल्या विशेष गाड्यांना 'श्रमिक स्पेशल' असं नाव देण्यात आलं आहे. या गाड्या केवळ प्रवासी मजुरांसाठीच चालवल्या जाणार आहेत, ज्यांना लॉकडाऊनमुळे आपल्या मायदेशी जायचे आहे.
गृह मंत्रालयाने (MHA) रेल्वे मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या विशेष गाड्यांद्वारे देशभरातील विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींच्या वाहतुकीस परवानगी देण्याचा आदेश जारी केला होता. या लोकांचा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर नेमले आहेत.
या व्यतिरिक्त रेल्वे मंत्रालयानं तिकिटांची विक्री केली आहे; रेल्वे स्थानक आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामाजिक अंतर आणि इतर सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यानंतर लोक स्थानकांवर येऊ लागले. रेल्वेने यासंदर्भात अपील जारी केलं आहे.
17 मेपर्यंत सर्व मेल / एक्स्प्रेस / उपनगरी इ. प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू इत्यादींसाठी विशेष गाड्या, ज्यांनी विविध ठिकाणी मुक्काम केला आहे, केवळ राज्य सरकारांच्या विनंतीनुसार नोंदणीकृत / नामांकित केलेल्यांसाठीच नियोजित केलं जाईल, तर राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
पश्चिम रेल्वेनं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व लोक स्टेशनवर येत नाहीत. केवळ तेच लोक येतात जे नोंदणीकृत आहेत आणि ज्यांना त्यांच्या राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. पश्चिम रेल्वेनं केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटले आहे की, 'कृपया लक्षात घ्या - राज्य सरकारकडून केवळ नोंदणीकृत आणि नामित व्यक्तींसाठी विशेष गाड्यांचं नियोजन केलं जात आहे. कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणास्तव रेल्वे स्थानकांवर आली नाही. रेल्वेची तिकिटं कोणालाही वैयक्तिकरित्या दिली जाणार नाहीत किंवा कोणतीही वैयक्तिक विनंती स्वीकारली जाणार नाही.'
रेल्वेने माहिती ही दिली
शुक्रवारी रेल्वेनं सांगितलं की, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना घेऊन जाण्यासाठी 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रमाणित प्रोटोकॉलनुसार, अडकलेल्या लोकांना पाठवणं आणि त्यांना रिसीव्ह करणं या दोन्ही संबंधित राज्य सरकारच्या विनंतीनुसार या विशेष गाड्या एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी धावतील. प्रवासी पाठवणार्या राज्यांद्वारे तपासणी केली जाईल आणि प्रवासाची परवानगी केवळ अशा लोकांना दिली जाईल ज्यात लक्षणं आढळली नाहीत.
असं म्हटलं जात आही की, सरकारला या लोकांना बॅचमध्ये आणावं लागेल, सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन करून आणि इतर सावधगिरी बाळगून रेल्वे स्थानकात रेल्वेमध्ये चढण्यापर्यंत रेल्वे स्टेशनवर येईपर्यंत स्वच्छता असलेल्या बसेसमध्ये बसून राहावं लागेल. प्रत्येक व्यक्तीनं चेहरा झाकणं आवश्यक आहे.