नवी दिल्ली: टी - २० विश्वचषक स्पर्धेला २ जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका व वेस्ट इंडिजमध्ये यंदाची टी - २० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेवर दहशतवादी हल्ल्याचे सावट ओढावले आहे.
वेस्ट इंडिज व कॅरेबियन देशांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. उत्तर पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट असोसिएशनने स्पर्धेच्या आयोजनासाठी सुरक्षेतेच्या दृष्टीने पावले उचलली असून, कडेकोट सुरक्षेची चोख व्यवस्था केली आहे.