पुणे: १० वर्षांआधी भारतावर आतंकवादी आक्रमणे व्हायची, मुंबईत आतंकवादी आक्रमणे होत होती, काशीमध्ये बाँबस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बाँबस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले की नाही ? जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात आतंकवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणे कठीण झाले आहे. पी.एफ्.आय.वर प्रतिबंध लावला, काँग्रेसच्या कार्यकाळात आतंकवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. पुणे येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केले आहे.
मला फक्त १० वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या वेळी बजेटमधे १ लाख कोटी रुपये ‘इनोव्हेशन’साठी दिले. पुण्याला याचा लाभ होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराचा टॅक्स वसूल केला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.